-: वैरण पिकांची
गरज, अभ्यास व महत्व :-
महाराष्ट्रात चराऊ रानांची सद्य:स्थिती फारच चिंतनीय आहे. दीर्घ काळापासून असंख्य गुरांनी अनिर्बंध व अमर्याद चराई केल्यामुळे त्या चराऊ रानांची सुधारणा न झाल्याने तसेच त्यात चांगल्या प्रकारची गवते न लावल्याने आणि चराऊ राने व कुरणे या नैसर्गिक साधन संपत्तीकडे अनास्थेने पाहण्याच्या दृष्टीमुळेच आजची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे
गवत व हिरव्या चाऱ्याच्या लागवडीसाठी शेताचे बांध, रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली मोकळी जमीन, नदी नाल्यांचे काठ, पाटाच्या कडा, पडीक जमीन यांचा उपयोग केला पाहिजे
गवताच्या लागवडीचे व जोपासनेचे सूत्र :
१.
जमिनीची मशागत :
चराऊ राने, जंगले, पडीक जमिनी, डोंगर उतार, शेताचे बांध, नदी नाल्याचे काठ, वैगेरे ठिकाणी गवते लावतांना, जमिनीची पूर्वमशागत करणे शक्य आहे किंवा नाही हे जमिनीच्या चढ उतारावर व खोलीवर, खडकांचा व मुरुमांचा कठीणपणा या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. साधारण सपाटीची जमीन असल्यास पाहिला पाउस पडून गेल्यावर तेथील तणांचे बी उगवायला लागल्यावर म्हणजे जून, जुलै महिन्यात शक्यतेनुसार नांगराची व कुळवाची पाळी द्यावी त्यामुळे जुन्या नको असलेल्या तणांचे ठोंब व नवे अंकुर मरतील, जमीन मऊ व भुसभुशीत होईल तसेच जमिंत ओल धरून ठेवण्याची क्षमताही वाढेल.जमीन सपाट ठेवण्य ऐवजी शक्यतो सरी व वरंब्यांनी उंच सखल ठेवावी म्हणजे जास्तीत जास्त पाणी मुरेल.
शेताचे बांध, नदीनाल्यांचे काठ, डोंगर उतारावरील व कठीण मुरमाची जमीन अशा ठिकाणी औताने मशागत करणे शक्य नसल्यास तेथील अनावश्यक जुन्या गवतांचे ठोंब फावड्याने तासून काढावेत त्यामुळे नवीन सुधारित जातीच्या रोपाला इतर तणांशी स्पर्धा करणे शक्य होईल व थोड्या काळातच त्याची झपाट्याने वाढ होईल
२.लागणीचा हंगाम :
लागवडीसाठी जुन ते ऑगस्ट हा पावसाळी हंगाम उत्तम आहे, गवताच्या सुधारित वाणांचे ठोंब अथवा रोप भरपूर पाऊस झाल्यानंतर लावावे
३.लागण :
वरील प्रमाणे मशागत केलेल्या रानात कुदळीने अथवा पाभरीने ६० से. मी. अंतरावर तास पाडून त्यात हाताने बी पेरून ते मातीने झाकावे बी २ से. मी. पेक्षा खोल पेरू नये हेक्टरी १० किलो बी पेरावे. बर्याच गवतांची लागवड ठोंबापासून तसेच रोपापासुनही करता येते.रोप अथवा ठोंब ६० * ३० से. मी. अंतराने लावावे. प्रत्येक जागी दोन ठोंब अथवा रोपे लावावीत.
४.खते :
लागणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ५० किलो नत्र व २५ किलो स्फुरदाची मात्रा द्यावी त्यामुळे गवतास फुटवे भरपूर येतात व वाढ हि जलद होते आणि उत्पन्न हि भरघोस मिळते
५.आंतरमशागत :
फारशी करावी लागत नाही, तथापी जास्त तण झाल्यास एक खुरपणी द्यावी किंवा मोठी व जोमदार तणे उपटून काढावीत त्यामुळे स्पर्धा कमी होऊन गवत लवकर जोमाने वाढू लागते
६.कापणी अथवा चराई :
लागवडीच्या पहिल्या वर्षी बी झडण्या आधी कापू नये तसेच चराईही करू नये त्यामुळे पुढील वर्षापासून सर्व रानात दाट गवत उगवेल. दुसर्या वर्षापासून गवत फुलोऱ्यावर असतानांच कापणी करावी, चराई करणार असल्यास पावसाळा सुरु होऊन ३० ते ४० दिवस लोटल्यावर म्हणजेच गवत दाट व ९ ते १२ इंच वाढल्यावर चराई सुरु करावी, एकाच ठिकाणी फार काळ गुरे चारू नयेत म्हणजे गवत वाढण्यास संधी मिळेल.
७.गवत फुलोऱ्यात असतानांच कापणी करावी :
फुलोऱ्यात आलेल्या गवतांची वाढ जवळ जवळ पूर्ण झालेली असते त्यामुळे उत्पन्न भरपूर मिळतेच पण त्यात प्रथिनांचे प्रमाण हि जास्त असून तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते त्यांमुळे पचण्यास ते हलके असते. हिरवागार आकर्षक रंग असल्यामुळे गुरे चारा आवडीने खातात गवत फारच उशिरा म्हणजेच बी झडून गेल्यावर कापल्यास खऱ्या अर्थाने ते गवत नसून निव्वळ पेंढा असतो त्याची पोष्टीकता फक्त २५ ते ३० टक्यांपर्यंत असते शिवाय जास्त तंतुमय झाल्याने पचन क्षमता हि कमी होते त्यामुळे बराचसा चारा न खाल्याने वाया जातो. उशिरा कापणी करणे म्हणजेच पर्यायाने निसर्गाने दिलेली अन्नसत्वे वाया घालवणे होय.
·
वैरण पिकांसाठी योग्य जमिनी बाबत माहिती :
अ.क्र.
|
चारा पिक वर्गीकरण
|
चारा पिकांचे नाव
|
योग्य जमीन
|
१.
|
तृणवर्गीय
|
ज्वारी
|
मध्यम व उत्तम निचरा होणारी
|
बाजरी
|
हलकी ते मध्यम
|
||
मका
|
मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी
|
||
|
|
ओट
|
सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते
|
२.
|
कडधान्य
|
चवळी
|
मध्यम जमीन
|
बरसीम
|
मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी
|
||
लसूण घास
|
चांगला निचरा होणारी, मध्यम जमीन व ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण मध्यम आहे अशाहि जमिनी उत्तम प्रतिसाद देतात
|
||
गवार
|
मध्यम जमीन व निचरा होणारी
|
||
३.
|
बागायती गवत
|
गिनी
|
सर्व प्रकारची किंवा उत्तम निचऱ्याची जमीन
|
नेपियर
|
पाणी साचणाऱ्या जमिनी सोडून इतर कोणतीही जमीन
|
||
गजराज
|
भारी व निचरा होणारी
|
||
४.
|
कोरडवाहू गवत
|
मारवेल
|
मध्यम ते हलकी
|
र्होडस
|
हलकी ते मध्यम जमीन
|
||
|
|
बेर
|
मध्यम पाण्याचा निचरा होणारी
|
अंजन
|
सर्व प्रकारच्या जमिनीत येते
|
||
५.
|
अवर्षण क्षेत्रात वाढणारे गवत
|
सुबाभूळ
|
सर्व प्रकारची जमीन
|
स्टायलो
|
मध्यम ते हलकी पाण्याचा निचरा होणारी
|
||
दशरथ
|
हलकी ते मध्यम
|
||
रानमुग
|
मध्यम ते भारी
|
·
लागवडीच्या मशागती करिता आवश्यक अवजारे :
१. कुळवणी किंवा वखरणी : जमीन पेरणी योग्य बनविण्याकरिता तीन कुळव किंवा वखर फिरवण्याचे काम केले जाते. जमीन भुसभुशीत बनविण्यास एक दोन वखरण्या करणे आवश्यक असते
वखर, तव्याचा कुळव इत्यादी साधनांचा उपयोग करतात.
२. बी झाकणे : बी जमिनीत पेरल्यानंतर ते झाकले नाही तर वाळून जाण्याची भीती असते बी झाकण्याचे काम वखराने करावे लागते
३. सऱ्यावरंबे पाडणे : पिकांची लागवड करण्याकरिता वाफे तयार केले जातात यासाठी सऱ्यांच्या नांगराने सऱ्या तयार करतात
·
पूर्व मशागतीसाठी कामाच्या दृष्टीने आवश्यक मुद्दे :-
Ø नांगरणी पासून जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी पूर्वीचे पिक काढल्यानंतर लगेचच नांगरट करावयास हवी, ती नांगरणीची खरी वेळ असते. कारण जमिनीत थोडी ओल असल्यामुळे पूर्वीच्या पिकांच्या काड्या व इतर पालापाचोळा जमिनीस सेंद्रिय पदार्थांच्या स्वरुपात मिळतो व त्याचप्रमाणे जमिनीचा पृष्ठभाग सूर्याच्या उन्हात उघडा पडून तणांचा नाश होतो. नांगरणीकरिता लोखंडी व लाकडी नांगर किंवा ट्रक्टरचा वापर करता येतो
Ø ढेकळे फोडण्याची वेळ कायमच येत नाही, जमिनीत फारच ओल असतांना नांगरट केली तर ढेकळे निघतात हे काम फळी, कुळवाच्या साह्याने केले जाते
Ø जर ओलीताची जमीन आवश्यकतेनुसार सपाट नसेल तर जमीन सपाटीकरण नांगरटी नंतर करतात त्यामुळे पावसाचे किंवा ओलिताचे पाणी सर्वत्र सारखे पसरते आणि त्यामुळे खोलगट भागात पाणी साचून रोपटी पिवळी होत नाहीत त्यामुळे जमिनीची धूप थांबते. याकरिता लोखंडी फळी, आळवट नावाची फळी अशा साधनांचा उपयोग करता येतो
Ø पेरणीकरिता जमिनीवर शेवटचा हात फिरवण्यापूर्वी त्यात भरखते घालून ती पूर्णपणे मिसळवली जातात याकरिता स्प्रेडर, देशी नांगर, फण, कोळपे, वखर, तव्याचा कुळव इत्यादींचा वापर करता येतो
Ø मोकळ्या असलेल्या जमिनीला पिक उभे राहण्याकरिता बंद करणे आवश्यक असते म्हणजेच त्याला आपण जमीन घट्ट करणे असे म्हणतो. हे काम उलटा वखर किंवा वजनदार फळ्या शेतात फिरवून करतात
Ø आंतरमशागत हि तणाचा नायनाट करण्यासाठी, जमिनीला भेगा पडू नये म्हणून, जीवाणूच्या कार्याला मदत म्हणून, जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी, अधिक पाणी शोषून घेण्याकरिता, जमिनीचा पृष्ठभाग मोकळा करण्यासाठी व मुळांची छाटणी करण्यासाठी, पिकांना भर देण्यासाठी, कीटकांचा नाश करण्यासाठी, आणि विरळणी करण्यासाठी अशा विविध रुपी कामांसाठी आंतरमशागत केली जाते आंतरमशागत हि खुरपणी किंवा कोळपे यांमार्फत केली जाते
वैरण पिकांची लागवड
गिनी गवत :
पेरणीच्या वेळेस जमीन भुसभुशीत करून ठेवावी
मार्च ते जुलै या कालावधीत लागवड करणे योग्य असते लागवडीतील
अंतर ६० ते ९० से.मी. ठेवून सऱ्यावर लागवड करावी प्रत्येक ठिकाणी दोन ठोंब लावावेत
प्रत्येक कापणीनंतर ५० ते ६० किलो स्फुरद, २५ + २५
नत्रखताची मात्रा प्रती हेक्टरी देण्यात यावी तसेच लागवडी दरम्यान ६० किलो स्फुरद
व २० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे
लागवडीनंतर पहिली कापणी दोन ते अडीच महिन्यांनी करावी
त्यानंतरच्या कापण्या ३० दिवसाच्या अंतराने कराव्यात
साधारणत: या पिकाच्या १० ते १२ कापण्या केल्या जातात
स्टायलो :
मध्यम ते हलकी जमीन, चांगल्या, हलक्या, मध्यम व भारी अशा
सर्वच प्रकारची जमीन या पिकास मानवते
खोल नांगरणी व कुळवाची पाळी देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी
बी पेरणी करतानी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे तसेच
पेरणीच्या वेळेस दोन ओळीतील अंतर ५० से.मी. इतके असावे
साधारण २० ते २५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे
सर्वसाधारणपणे दोन कापण्या केल्या जातात
हिरवा तसेच सुका चारा हि खाद्य म्हणून वापरता येतो
प्रा. अजय गवळी ८००७४४१७०२
No comments:
Post a Comment