दूध दीर्घकाळ टिकवणे-समस्या व उपाय
शेती शास्त्रातील रूढ व पारंपारिक
पद्धतींचा आज विसर पडत चालला आहे. अगदी लहानातील लहान शेतकरी सुधारित
तंत्रद्यानाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेती व्यवसायाला दुग्धउत्पादन हा
एक अतिउत्तम जोडधंदा आहे हे सर्वमान्य आहे . परंतु आता जोडधंद्यापुरतेच याचे महत्व
मर्यादित राहिलेले नाही. दूग्धउत्पादन हा एक मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारला जात
आहे. गेल्या काही वर्षात दूग्ध व्यवसायात भारताची झालेली प्रगती भूषणावह आहे.
शासन, कृषी विद्यापीठे, सहकारी संस्थामार्फत होनाऱ्या
प्रयत्नाने दूध उत्पादन वाढीचे रहस्य शास्रोक्त तंत्रद्यानाने शेतकर्यापर्यंत
पोहचविले जात आहे. शासकीय अनुदान, कमी व्याजात बँकेतील कर्ज अशा सोयीं सुविधामुळे
शेतकरी मोठ्या प्रमाणात दूग्ध उत्पादन करण्यासाठी झेप घेत आहे.
आज जगात भारताचा दुग्धौउत्पादनात पहिला क्रमांक असून दूध हे
पूर्ण अन्न म्हणून संबोधले जाते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरीकरणामुळे शहरांची
व्याप्ती वाढत आहे. शहरात वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या गरजा हि वाढत आहे. आहारातील
मुख्य गरज म्हणजे दररोज लागणारे दूध. दररोज दूरवर खेड्यात उत्पादित होणारे दूध
शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचले जाते. परंतु ग्रामीण भागातील शेतकर्यांना दूध
काढल्यानंतर शहराकडे वाहतूक होईपर्यंत दूध चांगल्या स्थितीत कसे राहील अशी चिंता
असते.
अस्वच्छ दूध काढण्याची पद्धत, वातावरणातील तापमान, दूध
टिकविण्याच्या साधनांची कमतरता, दूध काढणाऱ्या व्यक्तीस असणाऱ्या वाईट सवयी, जसे
धुम्रपान, तंबाखूचे सेवन करणे, अपुरी वाहतूक व्यवस्था, या कारणांमुळे दूधामध्ये
सुक्ष्मज्न्तूंची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे दूध नासून खराब होण्याची शक्यता
खेडेगावातील भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब असते.
दुध उत्पादनाची केंद्रे म्हणून बहुतांशी सर्व खेडी संकलन
केंद्र आणि दूध प्रक्रिया केंद्र यापासून दूर अंतरावर आणि वाहतुकीच्या दृष्टीने
आडमार्गावर तसेच विशेषतः कोकणात डोंगराळ भागात वसलेली आहे. अशा ठिकाणी वास्तव्य
करणाऱ्या छोट्या व मध्यम शेतकर्यांना त्याच्याकडे उत्पादित झालेले दूध शहराकासे
पाठविण्यासाठी वेगेवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. खेडेगावातून शहराकडे
जाणारा एकच मार्ग असल्याने तसेच दूध वाहतूक करत असताना डोंगराळ भागतील अडथळे
चढ-उतारात वाहने बिघडण्याची शक्यता, पर्यायाने वाहनांची अनिस्चीतता अशा अनेक
अडचणींना तोंड देऊन दूध वेळोवेळी चांगल्या स्थितीत पाठविणे हि अत्यंत जोखमीची बाब
आहे. कोकणात तर हि समस्या तीव्र स्वरुपाची आहे.
आपल्याकडे नियमितपणे दिवसातून सकाळ व संध्याकाळ असे दोन
वेळा दूध काढले जाते. शासकीय योजना किवा सहकारी संस्था यांमार्फत दिवसातून एकाच
वेळा दूध एकत्र करून वाहतूक केली जाते. हि वाहतूक बहुतांशी सकाळच्या वेळीच केली
जाते. त्यामुळे संध्याकाळी काढलेले दूध दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चांगल्या स्थितीत
टिकविणे हि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.
शासकीय योजनेद्वारे किवा सहकारी संस्थामार्फत दुधाची वाहतूक
सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळा दूध एकत्रित करून केल्यास दूध टिकविण्यासंबंधीचा
प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु दिवसेंदिवस इंधनांच्या किमतीत होणारी वाढ,
वाहनांच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च, वाहनांची होणारी झीज यांचा एकंदरीत होणारा
खर्च व एकाच वेळी मिळणारे दूध याचे प्रमाण पाहता दोन वेळा दूध गोळा करून वाहतूक
करतात.
सर्व गोष्टींचा विचार करता दूध
काढल्यानंतर ते डेअरीमध्ये पोहोचेपर्यंत दीर्घकाळ टिकविणे याबाबतच्या
तंत्रद्यानाची माहिती दूध उत्पादकांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून दूधाची प्रतवारी
टिकून राहील. काढलेल्या दुधाची विक्रीही होईल. दूध चांगल्या अवस्थेत टिकणे हे
दूधातील सुक्ष्म जंतूच्या संख्येवर अवलंबून असते. कमी तापमानापेक्षा जास्त
तापमानाला जंतूंची वाढ अनन्य साधारण होते. (साधारणता: २०० से. पेक्षा
जास्त) त्यामुळे दूध काढल्यानंतर ताबडतोब थंड करण्यासाठी उपाययोजना केल्यास
सुक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते व त्यामुळे दुधाची प्रतवारी टिकण्यास मदत होते. दूध
व्यवसायातील मोठे व्यावसायिक, सहकारी संस्था, यांकडे सुधारित शीतगृह, शीतपेटी ई.
सारखे दूध दीर्घकाळ टिकवण्यासाठी साधने उपलब्ध असतात. या साधनाकरिता विजेची
आवश्यकता असते. खेडेगावातील छोटा व मध्यमवर्गीय दूध उत्पादकांना अशी साधने
परवडणारी नसतात आणि वीजपुरवठा वरचेवर खंडित होण्याची समस्या देखील त्यांना भेडसावत
असते. शिवाय दुसरा पर्याय म्हणजे बर्फ वापरून दूध थंड ठेवून त्याचा जतन कालावधी
आपण वाढवू शकतो. परंतु काही दूरवरच्या खेड्यामधील बर्फ मिळणे अशक्य बाब असते.
विजेचा पुरवठा, पेट्रोल, केरोसीन, डिझेल इत्यादी इंधनावर चालणाऱ्या मोटारीद्वारे
होणारे शीत उपकरणे फारच खर्चिक असते.
अशा सर्व अडचणीवर मात करून हि समस्या
सोडविण्यासाठी व दूध टिकविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,
दापोली येथे संशोधन केले आहे. त्याआधारे असे निदर्शनास आले आहे कि, दूध थंड
करण्यासाठी एक अतिशय स्वस्त सुलभ असा “ शीतकक्ष ” वापरता येईल.
त्यासाठी वीज, पेट्रोल, केरोसीन, डीझेल,
अशा कोणत्याही उर्जेची आवश्यकता नाही. शून्य उर्जा शितकक्षाची माहिती पुढीलप्रमाणे
शून्य उर्जा शीतकक्षाची बांधणी व रचना :-
शीतकक्षाचे बांधकाम अत्यंत सोपे , स्वस्त असून सामान्य
वर्गातील शेतकर्यांना परवडणारे आहे. शून्य
उर्जा शितकक्ष स्वत: शेतकऱ्यानाच तयार करता येते. त्यासाठी फोटोमध्ये
दाखविल्याप्रमाणे फक्त वाळू, विटा आणि नारळाच्या फांद्यांपासून विणलेले झाप या
गोष्टींची आवश्यकता आहे. त्याची बांधणी अतिशय सोपी आहे. पायासाठी विटांचा एक थर
लावावा आणि चारही बाजूंनी एकेरी विटांची भिंत रचावी. या दोन्ही भिंतीमधील (७.५
से.मी.) जागेत वाळूचा थर भरून घ्यावा.
शीतकक्षावर झाकण म्हणून नारळाच्या फांद्यांपासून विणलेले
झाप वापरता येते. शीतकक्षामध्ये दूध ठेवण्यापूर्वी विटा व वाळूवर पाणी शिंपडावे.
तसेच दुधाची किटली ठेवल्यानंतरही पाणी शिंपडावे जेणेकरून आतील वातावरण दूध
टिकवन्यासाठी थंड राहील. यासाठी ठिबक संचाचाहि वापर करणे शक्य आहे. शितकक्षाची
उभारणी हि सावलीच्या ठिकाणी करावी. सर्वसाधारणत: ६०* ६०* ६० से.मी. आकाराच्या
शीतकक्षात १० लिटर ठेवू शकतो. दुधाच्या किटलीच्या आकारानुसार आपणास अनुभवावरून
शीतकक्षाचे आकारमान ठरविता येते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील
संशोधनावरून असे निदर्शनास आले आहे की, हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही हंगामात
काढलेले दूध शीतकक्षामध्ये दुसऱ्या दिवशीपर्यंत चांगल्याप्रकारे टिकू शकते.
कोकणातील हवामानात सर्वसाधारणपणे ४ ते ५ तासापर्यंत दुधाची प्रतवारी चांगली राहू
शकते. परंतु शीत कक्षाचा वापर केल्यामुळे
उन्हाळी हंगामात दूध काढल्यापासून १५ तास तर हिवाळी हंगामात १९ तासांपर्यंत दूध
चांगल्या स्थितीत राहू शकते. पावसाळी हंगामात कोकणात आद्रतेचे प्रमाण ८४ ते ९४
टक्के इतके जास्त असल्याने शीतकक्षाचे उपयोगिता विशेष अशी महत्वाची नसते. विदर्भ,
मराठवाडा यांसारख्या इतर भागांमध्ये जेथे वातावरणातील तापमान खूप अधिक असते.
दुधातील सुक्ष्मज्न्तूंची वाढ झपाट्याने होत असते तेथे देखील शीतकक्षाचा वापर करून
दुधाची प्रतवारी टिकवण्यास मदत होवू शकते. वातावरणातील तापमान जसे वाढेल तसे वाळू
ओली राहील व शीतकक्षातील वातावरण थंड राहील याकडे विशेष खबरदारीने लक्ष देणे
गरजेचे असते.
अशा प्रकारे विजेविना, अत्यल्प खर्चात साध्या सोप्या
पद्धतीने कमी शारीरिक श्रमाने साकारलेल्या अशा शून्य उर्जा शितगृहाचा वापर खेद्यासारख्या ठिकाणी केल्यास दूग्धव्यवसाय
करणाऱ्या छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल.
अधिक माहितीसाठी प्रा. अजय गवळी (८००७४४१७०२)
No comments:
Post a Comment