: शेळीपालन व्यवसायासाठी महत्वाचे :
भारतामध्ये विविध
भागांमध्ये शेळ्यांच्या विविध जाती आहेत. या जातींचे वर्गीकरण खालील प्रकारे होऊ
शकेल.
१) हिमालयीन राज्ये
गड्डी, चांगथंगी, चेगू
२) उत्तर व पश्चिम भारत जमुनापरी, बिटल,बारबेरी, सुरती इ.
३) मध्य व दक्षिण भारत
उस्मानाबादी, संगमनेरी
४) पूर्वेकडील राज्ये
काळी बंगाली, गंजम इ.
आपल्या हवामानानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार व उपलब्ध साधनसामुग्रीनुसार कोणत्या जातीची निवड करावी हे अभ्यासून शेळीपालन करणे हितावह ठरेल.
शेळ्यांची निवड कशी करावी :
मादी १ ते ३ वयोगटाची तर नर (बोकड) १ ते २ वर्ष वयाचा असावा. बाहेरून जनावरे आणायचे असेल तर त्यासाठी त्यांच्या दातांची परीक्षा
करावी. दातांच्या
परीक्षणामुळे वयाचा अंदाज बांधता येतो. क्वचितप्रसंगी जनावर ३६ महिन्यांचे असताना त्यांना सर्व दात आलेली असतात. कळपासाठी १४ ते २४ महिन्याचे जनावर उपयोगी ठरतात.
गोठे व्यवस्थापन :
शेळ्यांना बंदिस्त राहण्यापेक्षा खुल्या वातावरणात राहण्यास आवडते. परंतु
प्रतिकूल हवामानात व जंगली
जनावरांपासून त्यांना सरंक्षण हवे. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने गोठ्याची रचना केल्यास फायदेशीर ठरते.
गोठयांची रचना:
गोठ्यांची जागा मुख्य रस्ता व रहदारीपासून दूर
असावी भोवतालच्या जागेपासून उंच असावी. गोठा कोरडा व भरपूर सूर्यप्रकाश
देणारा असावा. गोठ्यात ओलावा
राहिल्यास कीटकांची वाढ होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी उपलबध असावे. पिलांच्या सरंक्षणार्थ व्यवस्था असावी. प्रत्येक शेळीस १० ते १२ फूट एवढी सावलीची जागा त्यांना
फिरण्यासाठी असावी. शेळ्याच्या गोठ्याभोवती झाडे लावलेले असावे तसेच हवा खेळती असावी.
उष्णप्रदेशीय हवामानात जनावरांचा गोठा :
गर्मीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी मोठा गोठा आवश्यक आहे. जनावरांना शरीरातील
उष्णतेच्या व्यतिरिक्त सौर प्रकाश व गरम हवेपासून देखील उष्णता मिळते. उष्ण हवामानात शास्त्रशुद्ध पद्धतीने गोठे बांधल्यास बाह्यसाधनाद्वारे जनावरांना मिळणारी उष्णता
आपण कमी करू शकतो. सूर्यप्रकाशापासून बचावासाठी वृक्षाची सावली नैसर्गिक साधन असून विभिन्न ऋतू लक्षात घेता विशिष्ट गोठे बांधने आवश्यक आहे.
१) शेळीच्या घराच्या लांबीची दिशा : आपल्या देशामध्ये शेळीच्या घराची लांबी पूर्व पश्चिम ठेवल्यास फायदेशीर असते. पूर्व-पश्चिम लांबी
असणाऱ्या घरांमध्ये अधिक काळापर्यंत सावली राहते.
२) शेळ्यांच्या गोठे बंद की उघडे : शेळ्यांचे गोठे पूर्णपणे बंद असावे की बंद, उघडी असावी अथवा पूर्ण उघडी अर्थात
फक्त छत असणारी असावी उष्ण हवामान असणाऱ्या भागात पूर्व-पश्चिमेस तर उत्तर दक्षिणेकडील भिंती अर्ध्या
उंचीपर्यंत असाव्या व त्यावर
सुरक्षेसाठी लोखंडाची जाळी लावावी.
३) गोठ्यांचा आकार : गोठ्याची रुंदी ५
ते ६ मीटर उत्तम राहते. रुंद पशुशाळेत फरशीचे तापमान कमी राहते. ६० ते ८० शेळ्या ठेवायच्या असल्यास लांबी ८० मीटर ठेवावी. अधिकतम लांबी ३० मीटर पर्यंत राहते. यापेक्षा जास्त शेळ्यांची
संख्या असल्यास दुसरा गोठा बांधावा.
४) गोठ्यांची उंची : गोठ्याची मधोमध उंची ३ ते ५ मीटर ठेवावी. खूप अधिक उंच असणारे गोठे अधिक उपयुक्त ठरत नाही. बकरी व मेंढी यांच्यासाठी गोठ्यांची उंची जवळपास ३ मीटर तर मोठे
पशु जसे गाय - म्हैस यांसाठी ४ ते ५ मीटर उंची असते.
करडांचे मरणप्रमाण कमी करण्यासाठी प्रबंध
:
१) करडू जन्मल्या बरोबर तोंड व
नाकपुड्यातील झिल्ली काढून कपड्याने कोरडी करून पिल्लास लाकडाचा भुसा आंथरलेल्या
गादीवर ठेवा.
२) श्वसन प्रक्रिया सुरु होत नसल्यास
मागील पाय उंच धरा व तोंड जमिनीकडे ठेवून हळूच झटके दया.
३) पिलांच्या कटघरांची सफाई किटाणूनाशक
जसे फिनाईल १०% वापरून धुवून काढा.
४) पिलांच्या जन्म झाल्यावर २ ते ३ इंच
अंतराने पिलांची नाळ बांधावी.
५) पिलांच्या जन्म झाल्यावर अर्धा तासात
( ३० मिनिटात ) त्याला शेळीच्या आचळातील पहिले दूध पाजावे या दुधाला चीक म्हणतात.
६) जन्मतः पिल्लांचे जे वजन असेल
त्याच्या १०% दूध पिल्लांना पाजावे व नंतर दिवसातून तीन वेळा आईचे दूध पाजावे.
७) नवजात पिल्लांना ३ - ४ आठवड्याचे
होईपर्यंत हवामानातील बदल भावणार नाही याची दक्षता घ्यावी.
८) खूप जास्त पिल्ले थोड्या जागेत ठेवू
नये.
९) करडू जन्मल्यानंतर २ - ३ दिवसाने
मातेपासून वेगळे करावे.
१०) शेळी अधिक दूध देणारी असल्यास अशा
परिस्थितीत दूध काढल्यानंतर पिलांना प्यायला दयावे.
११) पिल्लांना स्वच्छ गोड पाणी हिरवा
चारा जसे गवत, कोवळे पाने १९ -२० दिवसानंतर खायला दयावे.
१२) दुधाच्या अतिरिक्त मिनरल मिक्चर
ज्यामध्ये लोह, तांब, मॅग्नेशियम झिंक तथा
सोडियम ७ ते १० दिवसानंतर खायला दयावे.
१३) पिल्लांना हिवाळ्यात ३ ते ४ आठवडे
थंडीपासून सरंक्षण दयावे
१४) पिल्लांना पिसु, गोचीड व बाह्य कीटकापासून बचावासाठी मॅलथियोन ०.% द्रावणात
बुचकाळा अथवा अंघोळ घाला.
१५) पिल्ले तीन महिन्यांची झाली की त्यांना कृमीनाशक औषध द्यावे.
१६) आजारी पिल्लांना निरोगी पिल्लांपासून
दूर ठेवावेत पशु वैद्यकाची मदत घ्यावी.
करडांचा आहार
१) जन्मानंतर करडांना तीन दिवस चिक शरीरवजनच्या १/१० पॅट पाजावा.
२) जन्मापासून सुमारे ६० तर ९० दिवस
करडांचे संगोपन मुख्यतः दुधावर होत असते. कारण त्यांची पचनसंस्था पूर्णपणे विकसित
झालेली नसते.
३) पहिल्या महिन्यात दूध ४०० मिली. पासून ६०० मिली. पर्यंत वाढवत जावे. दुसऱ्या महिन्यापासून दुधाचे प्रमाण ६०० मिली. व खुराकाचे
प्रमाण ५० ग्रॅमपासून १५० ग्रॅमपर्यंत वाढवावे व चारा देण्यास सुरुवात करावी. तिसऱ्या महिन्यामध्ये दुधाचे प्रमाण ६०० मिली. वरून कमी करत १००
मिली. पर्यंत आणावे व खुराकाचे प्रमाण १५० ग्रॅमपासून २५० ग्रॅमपर्यंत वाढवावे. नहारपूर प्रमाणात हिरवी वैरण दयावी.
४) नार करडाचे तिसऱ्या महिन्यामध्ये खच्चीकरण करून घ्यावे (पैदाशीसाठी
वापरायचा नर वगळता) त्यामुळे मांसाची प्रत सुधारून वजन वाढते.
शेळीचा आहार
१) शेळ्यांना हिरवा चारा, कोरडा चारा व खुराकाची (पशुखाद्य) आवश्यकता असते.
२) हिरव्या चाऱ्याचे प्रमाण रोज
प्रत्येकी ४ - ७ किलो असावे लागते. यामध्ये लसूण, घास, बरसीम, मका, ज्वारी,इत्यादींचा समावेश
असावा.
३) रोज प्रत्येकी ०. ते १ किलो वाळलेला चारा देणे आवश्यक असते. यामध्ये ज्वारीचा कडबा, भुईमुगाचा पाला, तुरभुसा, हरभरा काड, कुलथी भुसा
इत्यादींचा समावेश असावा.
४) चारा दिवसातून वेगवेगळ्या वेळी
विभागून द्यावा.
५) याशिवाय शेळ्यांसाठी पशुखाद्याचे
प्रमाण २५० ते ३०० ग्रॅम असावे.
६) गाभण शेळ्यांना शेवटचा दिड महिना गाभण
काळात गर्भाच्या वाढीसाठी ५०% जास्त पशुखाद्य द्यावे.
बोकडाचा आहार
१) पैदाशीच्या बोकडासाठी शैळीप्रमाणे हिरवा व वाळलेल्या चाऱ्याचा आहार असावा.
२) परंतु पशुखाद्य प्रमाण या बोकडासाठी
४०० ते ५०० ग्रॅम असावे. यामध्ये खनिज मिश्रणांचेही पुरेसे प्रमाण असावे.
शेळीच्या घरगुती खुराकाचे प्रकार
नमुना १.
अ. घटक
परिणाम
क्र.
टक्केवारी/भाग/कि.ग्रॅ/ग्रॅम्स
१ हरभरा भरड
१५.००
२ मका भरड
३७.००
३ शेंगदाणा पेंड
२५.००
४ गव्हाचा कोंडा
२०.००
५ क्षार मिश्रण
२.५
६ मीठ
०.५
एकूण
१००.००
प्रा.अजय गवळी मोबा. ८००७४४१७०२
No comments:
Post a Comment